ते दिवस
माझ्याशिवाय तुला काहीच सुचत नव्हते,
समोर कितीही गर्दी होऊ दे तुला माझ्याशिवाय काहीच दिसत नव्हते,
काहीही झाले तरी तू माझ्याच मिठीत येऊन रडायचीस,
तुला आठवतात का ते दिवस त्या दिवसात तू वेगळीच दिसायचीस...।।१।।
तसे आपले एकमेकांकडे काहीच काम नसायचे,
पण तरीही एकमेकांशी न बोलता काहीच काम होत नसायचे,
तू नेहमीच मला फोन करायचीस,
फोन करून मात्र जेवलो की नाही बस एवढच विचारायचीस,
जेवण करून तर फक्त पोट भरते पण तुझ्या दोन मिनिटाच्या कॉल ने खरी भूक भागायची,
तुला आठवतात का ते दिवस त्या दिवसात तू वेगळीच दिसायचीस...।।२।।
छोट्या छोट्या गोष्टीवरून आपण भांडायचो,
बोलणार नाही तुझ्याशी आजपासून शेवट हेच ठरवायचो,
मात्र परत पाच मिनिटातच आपण पुन्हा भांडण करायचो,
यावेळी मात्र सॉरी चूक माझीच होती एवढाच हट्ट धरायचो,
आणि असं बोलता बोलता तू खूप गोड हसायचीस,
तुला आठवतात का ते दिवस त्या दिवसात तू वेगळीच दिसायचीस..।।३।।
असं वाटायचं आपल्या नात्याचा कधीच भूतकाळ नसावा,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझाच हात माझ्या हातात असावा,
पण हवं ते कधीच मिळत नसत,
सुखानंतर दुःख हे भोगावच लागत,
आजही आठवते मला तुझं माझ्यावर प्रेम आहे हे तू स्वतःची लग्नपत्रिका देताना सांगितलंस,
आईबाबा स्वतःपेक्षा जास्त महत्वाचे असतात हे तू सिद्ध करून दाखवलंस,
लग्नात तू ओठाने हसत होतीस पण मनातून मात्र तू खूप रडत होतीस,
खरं तर हसायचं कस हे जसं तू शिकवलंस तसच जाता जाता रडायचं कस हे ही तूच शिकवून गेलीस,
तुला आठवतात का ते दिवस त्या दिवसात तू वेगळीच दिसायचीस..।।४।।
समोर कितीही गर्दी होऊ दे तुला माझ्याशिवाय काहीच दिसत नव्हते,
काहीही झाले तरी तू माझ्याच मिठीत येऊन रडायचीस,
तुला आठवतात का ते दिवस त्या दिवसात तू वेगळीच दिसायचीस...।।१।।
तसे आपले एकमेकांकडे काहीच काम नसायचे,
पण तरीही एकमेकांशी न बोलता काहीच काम होत नसायचे,
तू नेहमीच मला फोन करायचीस,
फोन करून मात्र जेवलो की नाही बस एवढच विचारायचीस,
जेवण करून तर फक्त पोट भरते पण तुझ्या दोन मिनिटाच्या कॉल ने खरी भूक भागायची,
तुला आठवतात का ते दिवस त्या दिवसात तू वेगळीच दिसायचीस...।।२।।
छोट्या छोट्या गोष्टीवरून आपण भांडायचो,
बोलणार नाही तुझ्याशी आजपासून शेवट हेच ठरवायचो,
मात्र परत पाच मिनिटातच आपण पुन्हा भांडण करायचो,
यावेळी मात्र सॉरी चूक माझीच होती एवढाच हट्ट धरायचो,
आणि असं बोलता बोलता तू खूप गोड हसायचीस,
तुला आठवतात का ते दिवस त्या दिवसात तू वेगळीच दिसायचीस..।।३।।
असं वाटायचं आपल्या नात्याचा कधीच भूतकाळ नसावा,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझाच हात माझ्या हातात असावा,
पण हवं ते कधीच मिळत नसत,
सुखानंतर दुःख हे भोगावच लागत,
आजही आठवते मला तुझं माझ्यावर प्रेम आहे हे तू स्वतःची लग्नपत्रिका देताना सांगितलंस,
आईबाबा स्वतःपेक्षा जास्त महत्वाचे असतात हे तू सिद्ध करून दाखवलंस,
लग्नात तू ओठाने हसत होतीस पण मनातून मात्र तू खूप रडत होतीस,
खरं तर हसायचं कस हे जसं तू शिकवलंस तसच जाता जाता रडायचं कस हे ही तूच शिकवून गेलीस,
तुला आठवतात का ते दिवस त्या दिवसात तू वेगळीच दिसायचीस..।।४।।
Comments
Post a Comment